HW News Marathi
राजकारण

भाजपसाठी २०१९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा !

नवी दिल्ली | “देशात २०१४ मध्ये दुसरी लाट होती. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा नव्हता. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा नसूनही सरकार स्थापन झालेच असते. मात्र २०१९ मध्ये भाजपसाठी राम मंदिर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. देहरादूनमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. “श्रीराम सर्वांचे श्रद्धास्थान आहे. सरकार कोणाचेही आले तरी राम मंदिर उभारायलाच हवे. राम मंदिर उभारले गेले नाही तर साधू-संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु”, असा इशारा देखील मोहन भागवत यांनी यावेळी दिला आहे.

कटकारस्थाने करणे हा गडकरींचा स्वभाव नाही !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरीच्या काळात अनेक विधाने करीत भाजपला घरचा आहेर दिला. दरम्यान, मोहन भागवत यांनी नितीन गडकरी यांच्याविषयी बोलताना म्हटले कि, “कटकारस्थाने करणे हा नितीन गडकरींचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल, तर सर्वात आधी ते मला सांगतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

Aprna

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी दिले ‘हे’ तीन नवे पर्याय

Aprna