HW News Marathi
राजकारण

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

मुंबई |राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच,”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे उद्धव ठाकरे असे देखील म्हणाले की, कुभ कर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो. जोपर्यंत राममंदिर बांधणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कुंभकर्ण वेळत जागा झाला नाही, तर हिंदु पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येनंतर आम्ही आता पंढरपूरात कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आलो आहे.

“तुम्ही आमच्या हिंदु देवतांच्या नावाचे राजकारण करून नका. आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभेच्या शेवटी भाजपला इशारा दिला आहे. तसेच सोहराबुद्दीन शेखचा फेक एन्काउंटर प्रकरणी सर्व जणांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, बाबरी मशीद पाडणाऱ्यावऱ्या कारसेवकांवरील गुन्हे आजही कायम आहेत. तुम्हाला वाटते तर तुम्ही त्यांच्यावरील केस त्या कारसेवकांची मुक्तता करा.

गेल्या ३० वर्षापासून अयोध्येचा मुद्दा कोर्टात रखडला आहे. हे तुम्हा बाबरी मजीद पाडताना लक्ष्यात नाही आले. परंतु राम मंदिर बांधताना तुम्ही सांगता की, राम मंदिराचा मुद्दा कोर्टा असल्याची आठवण येते. पंढरपुरातील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकरी, पीक विमाव योजना, दुष्काळ अशा विविध मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

News Desk

राजस्थानमध्ये भर रस्त्यात सापडले बॅलेट युनिट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk