HW News Marathi
राजकारण

#RamMandir : न्यायालयाने देशाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत !

नवी दिल्ली | “न्यायालयाने देखील देशाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. देशाला रामराज्य हवे आहे, देशाच्या या भावनेचा आदर ठेवायला हवा. आम्ही भीक मागत नाही आहोत. लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी म्हटले आहे. ते विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेत बोलत होते. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानात आज (९ डिसेंबर) अयोध्या राम मंदिर उभारण्याबाबत विश्व हिंदू परिषदेकडून धर्मसभा बोलवण्यात आली आहे. या धर्मसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित राहिले.

“आम्ही न्यायालयाचा आदर करत निर्णयाची वाट पहिली आहे. संघर्षच करायचा असता तर आम्ही वाट पाहत बसलो नसतो. न्यायालयाची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे. ज्या देशात लोकांचा न्यायालयावरून विश्वास नाहीसा होतो, त्या देशाची प्रगती होणे अशक्य असते. अयोध्येत रामाचे दर्शन घेणारे आज दुःखी होतात. किती दिवस त्या मूर्तीला तात्पुरत्या छत्राखाली ठेवणार ? भक्तांना मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घ्यायचे आहे. सर्वांनाच वाटते कि रामाने भव्य मंदिरात राहावे”, असेही यावेळी भैयाजी जोशी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या | अशोक चव्हाण

News Desk

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

ममताजी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत !

News Desk