HW News Marathi
राजकारण

कमांडर अभिनंदन यांची सुटका मोदींमुळे नव्हेच, मात्र त्यांनी संपूर्ण श्रेय घेतले !

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेचे संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेतले. खरे म्हणजे कमांडर अभिनंदन यांची सुटका जीनिव्हा करारातंर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दबावामुळे झाली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्याचे संपूर्ण श्रेय स्वत:ला घेतले”, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. कोपरगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

“नरेंद्र मोदी यूपीए सरकारच्या काळात एखादी चकमक झाली तरीही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करीत होते. मग आता देशात पुलवामासारखा भीषण हल्ला झाला तेव्हा त्यांनी काय केले ?”, असा सवाल पवार यांनी केला आहे. “२०१४ साली लोकांनी पंतप्रधान मोदींना संधी दिली. मात्र, मोदी अपेक्षित प्रभाव पाडू शकले नाहीत. मोदी सरकारच्या धोरणांना आता लोकं कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांना उतरती कळा लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकारला याचा अंदाज आलाच आहे”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

News Desk

नागपूर NIT घोटाळ्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक; मुख्यमंत्री स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna

विरोधक असतानाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय असायला व्हावा! – संजय राऊत

Aprna