HW News Marathi
राजकारण

मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही !

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही. मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो. मी पंतप्रधान असताना परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर कायमच पत्रकार परिषद घेत होतो”, असे मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची प्रचंड चर्चा होताना दिसते. मात्र ते देशात परतल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग बोलत होते. “चेंजिंग इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. “आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे नाते पती-पत्नीसारखे असते. या दोघांमध्येही मतभेद असतात. परंतु तरीही त्यांना एकत्र राहून समाधान शोधणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केंद्र आणि रिझर्व्ह बँकेमध्ये देखील योग्य ताळमेळ असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. याचमुळे उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. परंतु, उर्जित पटेल यांनी मात्र आपण काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिलेच गव्हर्नर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिंदे गटात लवकरच मोठी फूट पडण्याची तयारी”, संजय राऊतांचा दावा

Aprna

महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे एकटे; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

#LokSabhaElections2019 : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार नाहीत !

News Desk