HW News Marathi
राजकारण

संघाचे भय्याजी जोशी-नितीन गडकरी यांची बंद दाराआड १ तास चर्चा

नागपूर | देशात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी विविध वृत्तसंस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. या एक्झिट पोलनुसार, केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान, यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सोमवारी (२० मे) तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय हे देखील यावेळी उपस्थित होते. ही चर्चा सामाजिक विषयांवर झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही ही चर्चा पंतप्रधान पदाबाबत असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

भय्याजी जोशी यांनी सोमवारी दुपारी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, नितीन गडकरी आणि भय्याजी जोशी यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली. नेमक्या कोणत्या विषयासंदर्भात ही चर्चा झाली, याबाबत जरी माहिती मिळू शकलेली नसली तरीही पंतप्रधान पदाबाबत ही चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी देखील सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, मोहन भागवत आणि मोदींची चर्चा झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप आलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

News Desk

पंतप्रधान मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित

News Desk