HW News Marathi
राजकारण

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

मुंबई | आज (मंगळवारी) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती .आज शिवसेनेला ५२ वर्ष पुर्ण झाली आहेत त्यानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असे म्हणत शिवसेनेने भाजपा वर निशाना साधला आहे. तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असे म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

केंद्रात सत्तेवर कोण येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना राष्ट्रीय पातळीवर निर्माण करेल असा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त केला आहे. दिल्लीतील आपचे आंदोलन, जवानांची हत्या, लोकशाहीच्या मुद्द्यावरून भाजपा व पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागण्यात आली आहे. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही.काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे.

नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल’, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे . उत्तर भारतात ऊठलेल्या धुळीचा काणोसा घेत ‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत . मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्य़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. असा टोमना वजा सूचक इशारा भाजपला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदिरा गांधींसारखीच खाजगी सुरक्षा रक्षकाकडून माझीही हत्या होईल !

News Desk

वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातच येणार होता; पुरावे सादर करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला

Aprna

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी! – शरद पवार

Aprna