HW News Marathi
राजकारण

प्रचारबंदीनंतर साध्वी प्रज्ञा यांनी मंदिरात जाऊन भजन गायले

नवी दिल्ली | भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशीदप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ७२ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी (२ मे) सकाळी ६ वाजल्यापासून ही कारवाई लागू झाली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर साध्वी प्रज्ञा यांनी मंदिरात जाऊन पूजा करून भजन देखील गायले आहे. त्याचप्रमाणे यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी मंदिरात ५ वेळा हनुमान चालीसेचे पठण देखील केले.

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा गेले अनेक दिवस त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आली आहे. “अयोध्येमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली त्यात मी सहभागी होते. त्यावेळी मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला दिलेल्या या संधीचा मला अभिमान आहे”, असे वक्तव्य

साध्वी प्रज्ञाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर देखील साध्वी प्रज्ञा आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी निवडणूक आयोगाने ७२ तासांची प्रचारबंदी केल्यानंतर ते उत्तर प्रदेशातील मंदिरात जाऊन पूजा करुन लोकांना भेटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडांना उद्या न्यायालयात हजर करणार; तत्पूर्वी होणार वैद्यकीय तपासणी

Aprna

#Results2018 : तेलंगणामध्ये टीआरएसने राखली सत्ता

News Desk

उद्या मोदींनी भाजपच्या प्रचारात ट्रम्प, पुतीन यांना उतरवले तर चालेल काय ? 

News Desk