HW News Marathi
राजकारण

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवालया हवे होते !

जालना | भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचे होते. दुसऱ्या देशात, मग खरे काय ते तुम्हाला कळले असते, असे वादग्रस्त विधान महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बद्दल केले आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधाने नवी वादाला तोंड फुटले आहे. विरोधक सातत्याने भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. यावरुन पंकजा यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंकजा मुंडे यांनी चांगलीच मुक्ताफळे उधळली. आजकाल कोणी पण उठतो आणि एअर स्ट्राईकचे पुरावे द्या म्हणतो, सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा विचारत होते कोठे केला ? म्हणून मी तर म्हणेन सरळ राहुल गांधी यांच्या गळ्यात बॉम्ब बांधून त्यांना पाकिस्तानला पाठवून द्या. मोदी ज्या लोकांना ओळखत नाहीत ते ही लोक सर्जिकल स्ट्राईक कुठे केला म्हणून विचारता किती लोक मेले? अशा लोकांना बॉम्बला बांधून हेलिकॉप्टरमधून खाली फेकून द्यायला पाहिजे, विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

Aprna

सिबीआय कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन

swarit

#KnowYourNeta | जाणून घ्या…यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबत

News Desk