HW News Marathi
राजकारण

संभाजी ब्रिगेडचा राजकारणात प्रवेश

मुंबई | औरंगाबादमध्ये २९ नोव्हेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची सांगता करत संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषद घेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली. लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

आगामी निवडणुकीचे बिगुल फुंकण्यासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बऱ्याच मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी आहे. तसेच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते, मात्र स्वतःचे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही, असे डोके यांनी म्हटले आहे. तरूणांच्या रोजगाराऐवजी शहरांचे नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

News Desk

स्टॉलच्या वादातून शिवसैनिकांनी केली उत्तर भारतीय तरुणाला मारहाण

News Desk

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

News Desk