HW News Marathi
राजकारण

बीजेपी से बेटी बचाओ

मुंबई | देशात बलात्कारच्या घटना अतिशय गंभीर झाल्या आहेत. या प्रकारणांवर बोलताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, हल्लीच कश्मीरच्या कठुआ गावात ८ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला सामुहीक बलात्कार आणि हत्या हे प्रकरण मन हेलावून टाकणारे होते.

परंतु सरकार कडून कोणत्याही प्रकारचे गंभीर पाऊल उचलले गेले नाही. कारण मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये भाजपचे आमदाराच गुंतलेले आहेत. त्यामुळे बीजेपी से बेटी बचाओ असे म्हणाची वेळ आली असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी भाजपावर केली.

भाजप सरकारला कृती करायला किंवा पंतप्रधानांना मुलींवर होणा-या आत्याचारावर भाष्य करायला ११ ते १२ दिवस जाऊ द्यावे लागतात ही बाब अत्यंत निंदनीय आहे. जे सरकार बेटी बचाव बेटी पढाव सारखे उपक्रम राबवत आहे त्यांच्यापासूनच मुलींना वाचविण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

News Desk

शंकरसिंग वाघेला राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?

News Desk

“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला

Aprna