HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री साहेब हे वागणे बरं नव्हं !

श्रीगोंदा | “विरोधी पक्षात असताना फडणवीसांनी पुराव्यानिशी बबनराव पाचपुते यांचा भ्रष्टाचार उघड करत मंत्री पदावरून खाली खेचण्याची मागणी केली होती. मात्र, आता ते काष्टीमध्ये येऊन स्वतः पाचपुतेंचीच स्तुती करत आहेत. मुख्यमंत्री साहेब हे वागणं बरं नव्हं”, असे म्हणत राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा येथील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. त्याचप्रमाणे, “आम्ही १३ वर्ष मंत्रीपद देऊनही जर तुम्हाला काही करता आले नसेल तर बांगड्या भरा”, अशा बोचऱ्या शब्दात शरद पवार यांनी पाचपुतेंवर टीका केली.

“१३ वर्ष मंत्री असणे ही काय छोटी गोष्ट आहे ? मात्र, तरीही काम करता आले नसेल तर काय करावं ? नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली. “मला १३ वर्ष मंत्री केले परंतु फक्त फक्त सहीचा अधिकार होता असे ते म्हणतात. पण, मंत्र्यांनी सही झाली म्हणजे तो आदेश होतो. मंत्र्यांचा हा सहीचा अधिकारच खूप मोठा अधिकार आहे. त्यांच्याकडे १३ वर्षे हा सहीचा अधिकार होता. तरीही त्यांना काहीच करता आले नाही मग आता काय बोलणार ? काय करावे ?”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“गेली १३ वर्षे ते मंत्री होते. गृह खात्याचे राज्यमंत्री होते. जातील तिथे पोलिसांचा सॅल्युट मिळायचा. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो कि मंत्रिमंडळात वनखाते अत्यंत महत्वाचे खाते आहे. मी स्वतः वनमंत्री राहिलो आहे. मुख्यमंत्री असताना गृहखाते सोडून वनखाते घेतले. तरीही हे म्हणतात कि काहीही करता आले नाही. जर असे असेल तर मग त्यांनी बांगड्या भराव्यात”, अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वारंवार अनेक राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टोकाची टीका होताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी माढ्याला वळवा !

News Desk

बडा चौकीदार सो गया, छोटा दमदार खो गया… | शत्रुघन सिन्हा

News Desk

राफेलबाबत संरक्षणमंत्री एका पाठोपाठ एक खोटे बोलत आहेत !

News Desk