HW News Marathi
राजकारण

ते म्हणतात २५ वर्षे युतीत सडली पण… !

मुंबई | विधानसभेचा निकाल लागून १२ दिवसांहून अधिकचा कालावधी आता उलटून गेला असला तरीही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात आता कोणाचे सरकार येणार ? कोण मुख्यमंत्री होणार ? याकडे आता सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी असे समीकरण देखील पाहायला मिळू शकते अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगात आहे. मात्र, आज (६ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “आपण विरोधी पक्षातच बसू” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“भाजप-शिवसेनेची युती आता नव्हे तर गेल्या २५ वर्षांपासून आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपच्या बाजूने बहुमताचा स्पष्ट कौल दिला आहे. २५ वर्षे युतीत सोडली असे ते म्हणाले मात्र निवडणूक एकत्रच लढले. त्यामुळे, भाजप-शिवसेनेने लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन करावे”, असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे “राज्यातील जनतेने आपल्याला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आपण येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू. ४ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर आता मला मुख्यमंत्री होण्याची बिलकुल इच्छा नाही”, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • शरद पवार मुख्यमंत्री बनण्यासाठी बिलकुल तयार नाहीत
  • संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नाहीत
  • राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे
  • भाजप-शिवसेना दोघांनी मिळून सरकार स्थापन करावे
  • भाजप-शिवसेनेने राजकीय अस्थैर्य दूर करावे
  • आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू
  • देशात बाबरी मस्जिदसारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये
  • त्या भेटीबद्दल गडकरी आणि पटेलांनाच विचारा
  • गडकरींची भेट रस्ते आणि विकासकामांसाठीच असते
  • काँग्रेसने काय निर्णय घेतला याची माहिती मला नाही
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी
  • विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा
  • लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. लोकांच्या निर्णयापुढे आम्ही काय बोलणार?
  • राष्ट्रवादी-काँग्रेसचा आकडा १०० च्या पुढे जात नाही
  • राष्ट्रपती राजवटीची फक्त शिवसेनेला भीती
  • ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुन्हा बिलकुल इच्छा नाही.
  • युतीत सोडले तरीही एकत्र लढले.
  • महाराष्ट्र अडचणीत आहे. लवकर निर्णय घ्यावा.
  • अयोध्या प्रकरणात कोणीही कायदा हातात घेऊ नये.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्ट्राईक | राजीव शुक्ला

News Desk

बाळासाहेब ठाकरेंचे सर्वात विश्वासू सहाय्यक चंपासिंह थापा यांचा शिंदे गटात प्रवेश

Aprna

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk