HW News Marathi
राजकारण

पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार म्हणतात…!

नवी मुंबई । काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. ते नवी मुंबईत बोलत होते. पवार पुढे म्हणाले, राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधे उत्साह निर्माण व्हावा. यासाठी जिलाध्यक्ष अशोक गावडे यांनी आज (१५ सप्टेंबर) नेरूळमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार बोलत होते.

विरोधी पक्षात बसून जास्त कामे करता येत असल्याचे सांगत देशात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्याची टीका पवारांनी केली. अडचणी आल्या तर त्यांना सामोरे गेले पाहिजे. परंतु काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलतात, असा टोलाही पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. या मेळाव्याला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, माथाडी नेते शशिकांत शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

Aprna

देशभक्तीला पर्यायी शब्द म्हणजे ‘चौकीदर’ !

News Desk

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी

News Desk