HW News Marathi
राजकारण

संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही !

मुंबई । “आज ज्यांचा हातात सत्ता ते संविधानावर आघात करतायत. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होवू देणार नाही”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. नवी मुंबई येथे बुथ कमिटीच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सध्या सत्तेचा गैरवापर करण्यात येतोय. दबावाचे राजकारण करण्यात येत आहे. काळा पैसा आणण्यासाठी पंतप्रधान स्वित्झर्लंडला गेले तेव्हा वाटलं विमानं पाठवावी एवढे पैसे ते आणतील परंतु हात हलवत आले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नोटबंदी दरम्यान बँकेच्या रांगेत १०० पेक्षा लोक मारले गेले, नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला, शेतकऱ्यांच्या घामाची किंमत उध्वस्त केली, असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.

“पुलवामामध्ये ४० जवान शहिद झाले. दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीत आम्ही सांगितलं आम्ही टीका करणार नाही. तुम्ही लष्कराला पूर्ण अधिकार द्या सांगितले. पण बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधी होते. फक्त एकाच पक्षाचे प्रतिनिधी नव्हते तो पक्ष म्हणजे भाजप होता. त्यावेळी चौकशी केली पंतप्रधान कुठे ? तेव्हा समजले पंतप्रधान धुळयाला येऊन राजकीय भाषण देत होते”,असेही शरद पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा आणि शरद पवार यांचा थेट कोणताही संबंध आलेला नाही | प्रकाश आंबेडकर

Gauri Tilekar

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

Aprna

#MarathaReservation : मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान, रिट याचिका दाखल

News Desk