HW News Marathi
राजकारण

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ मे) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यवार सकाळी १० वाजता भेट घेणार आहेत. सध्या राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी काल (२६ मे) इंदापूरला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली.

शरद पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, असेही सांगणार आहे. पुढे पवार असे देखील म्हणाले की, सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्याचे साठे आहेत. धान्याची बिलकूल कमतरता नाही, त्यामुळे राज्यात जोपर्यंत दुष्काळ परिस्थिती आहे. तोपर्यंत शासनाने अन्नधान्यांचा दुष्काळी भागात पुरवठा करावा, अशी मागणी देखील करणार आहे.

तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील नियमाल बदल करुन अशा प्रकारे धान्य पुरवठा करणे शक्य असल्याचेही पवारांनी सांगितले. शरद पवारांनी इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना तिथले लोक मागतील तितके पाण्याचे टँकर पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या राष्ट्रवादीने खासगी संस्थांच्या मदतीने अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात पाण्याचे टँकर सुरु केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत ?

News Desk

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री भाषण करताना विदर्भवादींनी घातला गोंधळ; पोलिसांच्या ताब्यात

Aprna

गोपाळ शेट्टी राजीनामा देणार का ?

News Desk