HW News Marathi
राजकारण

राज्यात शरद पवार यांचा दुष्काळी दौरा

उस्मानाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहेत. बुधवारी (१ मे) ते जिल्ह्याच्या विविध भागात भेटी देऊन दुष्काळग्रस्तांचे म्हणणे जाणून घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या दौर्‍याची माहिती दिली आहे.

“उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व रोजगाराचे प्रचंड हाल होत आहेत. खरिपातून अत्यल्प उत्पन्न मिळाले होते आणि रब्बीची तर बहुतांश ठिकाणी पेरणीच झाली नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. यातून अनेक शेतकऱ्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे”, असे राष्ट्रवादीने पत्रकात म्हटले आहे.

“शरद पवार येत्या १ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी १०:३० वाजता घाटपिंपरी (ता. भूम), दुपारी १२ वाजता चोराखळी ( ता. कळंब) तर दुपारी २ वाजता बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथे भेट देऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहावे”, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्याकडे अडचणी मांडून योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत सुचित करणार आहेत. राजकीयदृष्ट्या देखील या दौऱ्याचे विशेष महत्व आहे. कारण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ भक्कम करण्यासाठी देखील शरद पवार आतापासूनच प्रयत्न करणार असल्याचे चित्र या दौऱ्यातून दिसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला !

News Desk

अर्थमंत्र्यांनी लेखानुदान मांडताना अनेक वायदे आणि वादे केले !

News Desk

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

News Desk