HW News Marathi
राजकारण

व्यंगचित्राची कमाल, बुरा न मानो दिवाली है !

मुंबई | “व्यंगचित्राची कमाल, बुरा न मानो दिवाली है”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या एका व्यंगचित्रामुळे आता विधानसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या या व्यंगचित्रात वाघाच्या पंज्यात (हातात) कमळ, तर गळ्यात राष्ट्रवादीचे घड्याळ दाखविण्यात आले आहे. थोडक्यात, राष्ट्रवादीच्या साथीने भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. राज्यात भाजप १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विधानसभेच्या निकालानंतर आता पहिल्यापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने आता भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. राज्यातील विधानसभेकरिता भाजपकडून “अबकी बार २२० पार” इतकंच नव्हे तर विधानसभेच्या मतदानादिवशी “अबकी पार २२० नव्हे तर अबकी बार २५० टच” असा नारा दिला देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला यंदाच्या निवडणुकीत खूप मुश्किलीने १००चा आकडा पार करता आला आहे. एकीकडे भाजपची अशी स्थिती असताना दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीला जनतेने दिलेला कौल पाहता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी असही समीकरण पाहायला मिळू शकते, अशाही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच, आता संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या फक्त सभांना गर्दी, पण मते आम्हालाच !

Gauri Tilekar

हिंदू मतांच्या गणितासाठी भाजपच्या संकल्पपत्रात पुन्हा ‘राम मंदिरा’चा उल्लेख

News Desk

हा तर धनशक्तीचा विजय !

News Desk