HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेनेचे नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या पुन्हा एकदा 4 ऑगक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊतांची आज (19 सप्टेंबर) न्यायालयीन कोठडी संपली. यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने राऊतांविरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी (16 सप्टेंबर) आरोपपत्र दाखल केले होते. यामुळे सध्या राऊतांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्कामी वाढला आहे.

 

यापूर्वी राऊतांना 5 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली आहे. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

 

दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने चौकशी केली आहे. तर राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. या प्रवीण राऊत यांच्यामार्फत राऊतांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे.  याप्रकरणाचा ईडी तपास करत असल्याचे सांगितले आहे. या पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली.

 

यानंतर राऊतांना १ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. आणि न्यायालयाने राऊतांना न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत न्यालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊतांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने पुन्हा एकाद 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा एकदा 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दंगलीबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना कळवा !

News Desk

संसदेच्या अधिवेशनात मोदींची अग्निपरीक्षा

News Desk

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे !

Gauri Tilekar