HW News Marathi
राजकारण

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात जाणार

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांंच्या  पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स बजावला आहे. ईडीने (ED) वर्षा राऊत यांना आज (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलविले आहे. याआधी वर्षा राऊत यांना जानेवारी महिन्यात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाले होते. तेव्हा वर्षा राऊत यांची ईडी अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली आहे.

 

वर्षा राऊत यांच्या खात्यात काही अनोळखी लोकांशी पैशांचा व्यवहार झाल्याचे चौकशीत दिसून आल्यामुळे त्यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविले आहे. या प्रकरणातून मिळालेल्या पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमिनीचा व्यवहार केला आहे. हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणात 1 कोटी 17 लाखांच्या व्यवहारासंदर्भात  तपास सुरू असून याआधी 1 कोटी 6 लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचे न्यायालयाने सांगितले.  या पार्श्वभूमीवर ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे.

 

दरम्यान, पीएमएलए न्यायालयने राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे राऊतांच्या ईडीच्या कोठडीत मुक्काम वाढला आहे. यानंतर ईडीने राऊतांना 1 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली होती. राऊतांची आज (4 ऑगस्ट) ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान,  ईडीने राऊतांना 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली होती.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल !

News Desk

पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात !

News Desk

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढून दाखवा !

Gauri Tilekar