HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंचे आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पंढरपूर | शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. पंढरपुरात त्यांनी आज जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाच्या २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य जागावाटपावरही भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे नक्की काय म्हणालेत वाचा सविस्तर

1. शिवसेना जशी मराठा समाजाच्या मागे उभी राहिली, तशीच धनगर समाजाच्या लढ्यासाठीही खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभी राहिल

2. पाचही राज्यात भाजपचा सुपडासाफ, पण तेलंगणा आणि मिझोरामच्या जनतेने राष्ट्रीय पक्षांना गुल केलं

3. तेलंगणा आणि मिझोरामने प्रादेशिक पक्षांसाठी जे केलं, त्यात महाराष्ट्र मागे पडणार आहे का?

4. कुंभकर्णा वेळेत जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाक

5. या मुद्द्यांसोबतच दुष्काळही महत्त्वाचा आहे, जानेवारीमध्ये संपूर्ण दुष्काळी भागात दौरा करणार आहे, यापूर्वीही बीडमध्ये गेले होतो

6. संपूर्ण महाराष्ट्र पाण्याने त्रस्त, मुंबईतही पाणीबाणी, केंद्रीय पथक बुलेट ट्रेनसारखं आलं आणि धावती पाहणी करुन गेलं

7. मला जे करता येतं, तेच मी करतो, पण पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, पण त्यासाठी 2022 ची डेडलाईन दिली, मग 2022 साठी पुन्हा मोदींनाच मतदान करायचं का?

8. राफेल प्रकरणात जे झालं, तेच पीकविमा प्रकरणात झालं. अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिलं

9. बिहारमधील रामविलास पासवान, नितीश कुमार यांचं अभिनंदन, त्यांच्यापुढे भाजपला नमतं घ्यावं लागलं,

10. जे नितीश कुमार भाजपमुक्त भारत करायला निघाले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपा बसते.

11. देवादिकांच्या नावांचा जुमले देऊ, नका, ठोकून काढू

12. जानेवारीपासून मी स्वतः दुष्काळग्रस्त भागात फिरणार

13. कांदा प्रश्न कधी सोडवताय, पीकविमा कधी देताय ते सांगा

14. शिवसेनेच्या शाखा शेतकऱ्यांचे आवाज केंद्र

15. हे सरकार पुन्हा आणीबाणी आणतय, जनतेच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करतंय

16. कांदा राखून ठेवा, ते बेशुद्ध पडले की उपयोगाला येतील

17. निवडणुका आल्या की ह्यांच्या अंगात देव घुमायला लागतो

18. राममंदिराबद्दल पासवान आणि नितीशकुमार यांनी भूमिका स्पष्ट करावी

19. युती करायची की नाही हे जनता ठरवेल

20. ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलं त्यांचं आम्ही वाकडं करणार

21. शेतकऱ्यांच्या योजना दुप्पट करणाऱ्या योजना कुठं गेल्या

22. सैन्याची पगारवाढ नाही आणि शास्त्र सामग्रीत घोटाळा करता, किती पापं कराल

23. हल्ली पहारेकरीसुद्धा चोऱ्या करायला लागलाय

24. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू तुला सोडणार नाही

25. 5 राज्याच्या निकालांनी सत्तांध लोकांना हादरा

26. अयोध्येला कुंभकर्णाला जागे करायला गेलो होतो

27. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारलीय

28. बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जातोय

29. वेगवेगळ्या जातींच्या न्याय हक्कासाठी सोबत लढेल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna

…म्हणून नवज्योतसिंह सिद्धूंनी घेतली राहुल गांधींची भेट

News Desk

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk