HW News Marathi
राजकारण

शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम

मुंबई | राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर आज (८ नोव्हेंबर) थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. सत्तास्थापनेबाबत सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, शिवसेना अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे देखील या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता या बैठकीनंतर उद्धव ठाकरे थेट आमदारांना भेटण्यासाठी वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत. दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी “शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार” असा पुनरुच्चार केला आहे. “शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही राज्यातील जनतेची इच्छा आहे”, असे उद्धव ठाकरेंनी आपल्या बैठकीत म्हटल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी या बैठकीकरिता ‘मातोश्री’वरून शिवसेना भवनात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील राजकीय स्थिती आणि ओल्या दुष्काळासंदर्भात ही बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

एआयएडीएमकेचे १८ आमदार अपात्रच, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk