HW News Marathi
राजकारण

“ना मुख्यमंत्री, ना नेता अशी महाराष्ट्राची परिस्थिती”, उद्धव ठाकरेंची खंत

मुंबई | “महाराष्ट्राला जणू मुख्यमंत्रीच नाही. महाराष्ट्राला जणू नेताच उरलेला नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे”,  अशी खंत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवरून (Maharashtra-Karnataka Border Dispute) व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (8 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्रामध्ये कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. हा प्रश्न सोडवायला आतासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल, असे नाही. कारण एका पक्षाचे सरकार तिन्हीकडे असल्यावर इथल्याही सरकारचे नेते तेच आहेत.  पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांचेही नेता तेच असल्यानंतरही जोरात बोलतात. महाराष्ट्राला जणू मुख्यमंत्रीच नाही. महाराष्ट्राला जणू नेताच उरलेला नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही नेता दिल्लीत माननीय मोदी आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचेही तेच आहे. ते जर बोलत आहे तर हे का नाही बोलत. आणि केंद्र सरकार यामध्ये काय भूमिका घेणार आहे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राच्या दबावामुळे गप्प बसणार असतील. तर याचा अर्थ समजायचे काय?, असा खोचक टोला त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

कर्नाटकता जाण्यासाठी विजा सुरू करणार का?

“महाराष्ट्राच्या ज्या काही सीमा रेषा आहेत. मी नेहमी म्हणतो, सीमा भाग आहे तो सीमा भाग नसून जो कर्नाटक व्यप्त महाराष्ट्र आहे. असेच त्याला म्हणायला पाहिजे, कारण तिथली जी गावे आहेत. ती गावे पिढ्यांपिढ्या सातत्याने लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा त्यांनी निवडणुका जिंकून आम्हाला महाराष्ट्रात जायाचे आहे, हे दाखवून दिले होते. आज सुद्धा तिकडे आंदोलन होत आहेत. आपली 5 डिसेंबरला जी पत्रकार परिषद झाली. त्यानंतर सुद्धा त्या कान्नडी भागामध्ये आपल्या मराठी भाषिकांवर कान्नडी अत्याचार होतच आहे. अनेक जणांना अटक होत आहेत. मग शेवटी प्रश्न असता होतो. मग प्रश्न असा येतो की, ही एका देशातील दोन राज्य आहे की, हिंदुस्थान-पाकिस्तान आहे. महाराष्ट्रातील वाहनांना तिकडे येण्यास बंदी, तिकडे गेल्यावर काळे फासले जाते. महाराष्ट्रातील मंत्र्यांना आणि नेत्यांना तिकडे येण्यास बंदी आहे. मग आता तुम्ही तिकडे विजा सुरू करणार का?”, असे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मविआचे नेते सीमावाद विषय लावून धरला 

“बरोबर आहे, म्हणून माझे काय मत आहे. महाराष्ट्रानेच सयन्म पाळायचा का?, केंद्राची भूमिका नेमकी काय आहे?, केंद्रात संसद सुरु झालेली आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा विषय तिकडे लावून धरलेला आहे. बाकीचे खासदार महाराष्ट्रातून निवडून गेलेले आहेत. ते तोंडात बोळा घालून गप्प बसलेत? , कुठे पळालेत ते, ते का नाही आवाज उठवित”, असे अनेक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून बाहेर पडल्या

News Desk

मोदींना स्किझोफ्रेनिया झालाय का ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk

“…तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली”, अजित पवारांची टीका

Aprna