HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

आढळराव पाटलांना शिरूर मतदारसंघ सोडावा लागणार?

पुणे | महाराष्ट्रात आता शिंदे आणि भाजप गटाची युती आहे. तर गेली १५ वर्ष शिवसेनेचे खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र शिंदे गटात जाऊन देखील आढळराव पाटील यांना काही दिलासा मिळालेला नाही. उलट त्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. कारण भाजपने एक घोषणा केली आहे ज्यामुळे आढळराव पाटील यांचं टेंशन वाढलं आहे.

खरंतर शिंदे गटात गेल्यानंतर येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघात जोर लावताना पाहायला मिळत आहेत. पण अशात भाजपने एक घोषणा केली आणि आढळराव पाटलांचं टेन्शन दुप्पटीने वाढलंय. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी माधुरी मिसाळ यांनी ‘आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल’, अशी घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी भाजपने आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने देशभरातील लोकसभा मतदारसंघ निवडून तिथल्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून भाजपने चाचणीला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री रेणुका सिंग या लवकरच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अनेक भाजप कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. याचवेळी माधुरी मिसाळ यांनी घोषणा करून आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढवलंय.

कोल्हे आणि आढळराव वाद 

तसं पाहायला गेलो तर ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच होता. आढळराव पाटलांनी सलग तीन वेळा याच मतदारसंघातून विजय मिळवत खासदारकी मिळवली होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते चित्र बदललं. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला. शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यातला वाद आपल्याला माहितच आहे. ०१९ साली जेव्हा अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी आढळरावांविरोधात निवडणूक लढवली आणि अमोल कोल्हे जिंकूनही आले. या पराभवानंतर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातलं वैर कायमच राहिलं.

आढळराव पाटलांची कोंडी 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं असताना देखील आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातलं वैर नेहमीच राज्यात चर्चेचा विषय ठरलं. पण आताचं चित्र मात्र बदललं आहे. राज्यातली राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर उद्धव ठाकरे शिरूर मतदारसंघ अमोल कोल्हेंनाच देणार असल्याचं बोललं जात होतं. म्हणूनच आढळरावांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण असं असतानाही मिसाळ यांनी केलेल्या मोठ्या घोषणेमुळे आढळराव पाटलांना शिरूर मतदारसंघ सोडावा लागणार का? अशा चर्चा सुरू  झाल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे !

News Desk

मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही – बाळासाहेब थोरात 

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna