HW News Marathi
राजकारण

भाजपकडून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाही !

पुणे | “भाजपला जर घटकपक्षांना सोबत घ्यायचे असेल तर आधी त्यांनी आपल्या घटकपक्षांसोबत बोलणे आवश्यक आहे. मात्र, भाजप-शिवसेनेकडून आपल्या घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाहीत”, असे म्हणत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाजप-शिवसेनेविरोधी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, यावेळी आगामी विधानसभेकरिता शिवसंग्राम पक्षाने भाजप-शिवसेना युतीकडे १२ जागांची मागणी देखील केली आहे. आता विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अद्याप भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्याचप्रमाणे, युतीचा फॉर्म्युला ठरवताना भाजपला त्यांच्या घटकपक्षांचा विसर पडल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर विनायक मेटे त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

भाजपकडून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याचे त्याचप्रमाणे त्यांच्याबाबत घटकपक्षांबाबत विचार केला जात नसल्याने विनायक मेटे यांनी आज (२३ सप्टेंबर) पुण्यात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले होते कि आधी घटकपक्षांच्या जागांचा विचार केला जाईल आणि त्यानंतर भाजप -शिवसेनेच्या जागावाटपाचा निर्णय होईल. मात्र, आता भाजपकडून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाही. जर युती झाली नाही तर शिवसंग्राम पक्ष आगामी विधानसभेला स्वतंत्र लढेल. त्याचप्रमाणे जर अन्य घटकपक्ष भाजपच्या चिन्हावर लढले तर आम्हीही भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार आहोत”, असेही मेटे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk

चंद्रकांत पाटलांची पलटी, म्हणाले राजकीय संन्यास नाही

News Desk

कितीही प्रयत्न केलात तरी हे भ्रष्टाचाराचे भूत तुमचा पाठलाग सोडणार नाही !

News Desk