HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

पालघर | पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पालघर येथे गुरुवारी (आज) झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगांचा पराभव झाला असला तरी शिवसेनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांनाच जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.

पोटनिवडणुकी वेळी श्रीनिवास यांना फक्त १५ दिवस मिळाले होते, पण आता ८-९ महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही,असा आदेश उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास यांना दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीनंतरही लोकसभा स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले. आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, २०१९ चा हिरो तूच, असेही उद्धव यावेळी म्हणालेत. तसेच पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात देखील यावेळी करण्यात आली आहे.

‘साम दाम दंड भेद वाल्यांना श्रीनिवास यांनी घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन एवढी मते मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. सहा लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झाले. खिलाडूवृत्तीने हार स्वीकारावी लागते, पण मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असे उद्धव म्हणाले. मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे होते परंतु त्यांना मशिन बंद दिसल्या. उन्हामुळे जर यंत्रे बंद पडत असतील, तर आधी का तपासणी केली नाही? आयोग म्हणून काय केले? पैसे पकडले, नावे सागितली, पण काहीच केले नाही. हेच शिवसैनिकांविरोधात घडले असते तर? हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांवर बंदी घातली होती, मग पैसे वाटले म्हणून काय केले असते? नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात? असे संतप्त सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत! – अजित पवार

Aprna

लखनऊमध्ये प्रियांका गांधींचा दुर्गा अवतार

News Desk

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – एकनाथ शिंदे

Aprna