HW News Marathi
राजकारण

…तर तुम्हाला पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती !

मुंबई | “राष्ट्रवादीवाले भर पावसात सभा घेत आहेत. पण तुम्ही गावांमध्ये जेव्हा ठणठणाट होता, तेव्हा जर ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज तुम्हाला पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. माण-खटाव येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोल्ट होते. “जेव्हा करायला हवे होते तेव्हा करायचे नाही आणि आता आमचे सरकार मजबुतीने पुढे पाऊल टाकत असताना अपशकुन करायचा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) भर पावसात सभा घेतली. याच पार्श्वभूमीवर, सर्वच स्तरांतून शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. शरद पवारांच्या या जिद्दीचे, भूमिकेचे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “करायला हवे होते तेव्हा काम केले नाही. जेव्हा राज्यातील गावांमध्ये ठणठणाट होता तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला पावसात भिजत सभा घेण्याची वेळ आली नसती”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधलेला असताना दुसरीकडे शिवसेना नेता आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरेंनी मात्र शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले आहे. “मी शरद पवारांवर कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. साताऱ्यात पवारांनी भर पावसात भिजून सभा घेतली. ते खरंच कौतुकास्पद आहे”, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वोच्च न्यायालय | संजय राऊत

News Desk

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk