HW News Marathi
राजकारण

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटू शकलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून निर्माण झालेला संघर्ष अद्याप थांबायचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील घडामोडींना देखील चांगलाच वेग आला आहे. उद्या (९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपणार असून याच पार्श्वभूमीवर आज (८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र, त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचे काम पाहू शकतात. याच पार्श्वभूमीवर बोलताना आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. “काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावे आणि सूत्र हलवावीत यासाठी त्यांचे हे सर्व डावपेच सुरु आहेत. हे त्यांचे कारस्थान आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आज काय म्हणाले संजय राऊत ?

  • महाराष्ट्रात फार काळ काळजीवाहू सरकार राहू नये अशी राज्यातील प्रमुख विरोधी….प्रमुख पक्षांची इच्छा असेल तर ते महाराष्ट्राच्या हिताचेच आहे.
  • भाजपकडे जर बहुमत असेल तर फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून दिसायला हरकत नाही.
  • ज्याच्याकडे बहुमत असेल तो मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला दिसेल.
  • काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावे यासाठी हा डावपेच सुरु
  • काळजीवाहू म्हणून त्या पदावर बसावे आणि सूत्र हलवावीत, असे कारस्थान
  • पण आम्हाला त्याची काळजी नाही. काळजी त्यांनी करावी.
  • मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल.
  • खरंतर राजीनामा देऊन त्यांनी बाहेर जायला हवं. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नयेत.
  • आपल्याकडे जर बहुमत असेल तर त्या जोरावर पुन्हा तुम्ही तिथे काम सुरु करावे
  • पण जनतेने पराभव करूनही, बहुमत न देऊनही आपण राज्य करायचं हे ते म्हणतात त्या जनतेच्या ‘महाजनादेशाचा’ अनादर आहे जो महाजनादेश आपल्याला मिळालेला नाही.
  • अयोध्यात प्रकरणात शिवसेनेचे जे योगदान आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही.
  • कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालविण्याचा प्रयत्न होत आहे का ?
  • महाराष्ट्रात कोणताही पॅटर्न चालणार नाही
  • दिल्लीपुढे ना शरद पवार झुकले ना उद्धव ठाकरे झुकले
  • अयोध्येबाबत आता सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो मान्य करावाच लागेल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाजपेयींच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

News Desk

 कडकनाथ कोंबडीपालन घोटाळा : पोलिसांकडून २ संस्थापकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

News Desk