HW News Marathi
राजकारण

शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणतात…!

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष काही थांबायचे नाव घेतानाच दिसत नाहीये. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे मात्र शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांची देखील चर्चा सुरु आहे. मात्र, आज (६ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण ‘जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू’ असे स्पष्ट केले आहे. “जनतेने आपल्याला विरोधात बसण्याचा कौल दिला असून त्याचप्रमाणे आम्ही राज्यात जबाबदार विरोधी पक्षाचे भूमिका बजावू. त्याचप्रमाणे, मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नाही”, असे देखील शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवार जे बोलले त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांच्याकडे १०५ चा आकडा आहे त्यांनी सरकार स्थापन करावे”, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून खोचक वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि शरद पवारांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांची काही वक्तव्ये पाहता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी समीकरण दिसणार, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला बहुमतासाठी स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे. राष्ट्रवादी-काँग्रेसचा आकडा १०० च्या पुढे जात नाही. त्याचप्रमाणे लोकांनी आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला असून आम्ही राज्यात जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू”, असे शरद पवार यांनी आपल्या या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

नेमके काय म्हणाले शरद पवार ?

  • मी मुख्यमंत्री बनण्यासाठी बिलकुल तयार नाहीत
  • संजय राऊत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नाहीत
  • राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे
  • भाजप-शिवसेना दोघांनी मिळून सरकार स्थापन करावे
  • भाजप-शिवसेनेने राजकीय अस्थैर्य दूर करावे
  • ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुन्हा बिलकुल इच्छा नाही.
  • आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू
  • काँग्रेसने काय निर्णय घेतला याची माहिती मला नाही
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी
  • लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. लोकांच्या निर्णयापुढे आम्ही काय बोलणार?
  • राष्ट्रवादी-काँग्रेसचा आकडा १०० च्या पुढे जात नाही
  • महाराष्ट्र अडचणीत आहे. लवकर निर्णय घ्यावा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदीजी कमनशिबी कोण? तुम्ही की जनता?”; नवाब मलिकांचा बोचरा सवाल

News Desk

जाणून घ्या… काय आहे ऑगस्ता घोटाळा

News Desk

जेडीयूची बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा, भाजपला धक्का

News Desk