HW News Marathi
राजकारण

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी !

मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. “सरकारने एकमेकांवर टीका न करता, लोकांवर कोणत्याही नियम-अटी न लादता, होईल तेवढा दिलासा दुष्काळग्रस्त जनतेला देणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास भाग पाडू”, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले आहे. “दुष्काळाला घाबरून आत्महत्या करु नका”, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सरकारकडून केवळ मोठमोठे होर्डिंग्ज लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटण्यात येतो मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. यात शेतकऱ्यांचे केवळ २०-२५ रुपयेच माफ होतात. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. शेतकरी गुन्हेगार आहे म्हणून त्याला माफी देताय का ? त्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती हवी आहे. शिवसेना त्याला ती मिळवून देईल”, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता हे न पाहता शिवसेना तुमची मदत करेल. तुम्ही कधीही हाक मारा, शिवसैनिक तुमच्या मदतीला येतील”, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर ‘नेते पदा’ला कुठलीही किंमत राहीली नाही”, रामदास कदम यांचा राजीनामा

Aprna

सावध व्हा नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल | धनंजय मुंडे

News Desk

संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच !

News Desk