HW News Marathi
राजकारण

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांतील सर्वच नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये. ‘इतरांना कोणताही त्रास न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. या आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते. मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटना आणि कायद्याच्या नियमांमध्ये बसणारच आरक्षण द्यावे’, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘सरकारने विरोधकांच्या म्हणण्याचा विचार करून अंतिम निर्णय घ्यायचा असतो. परंतु हे सरकार विरोधकांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळू शकेल का ? याबद्दल आम्हाला शंका असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा समाजच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गोंधळ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता हा प्रश्न केंद्राकडे सोपवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अन् आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते !

News Desk

“दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SITमार्फत चौकशी होणार; उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा

Aprna

फैजाबादनंतर आता अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ होणार का?

News Desk