HW News Marathi
राजकारण

राज्यपालांनी मुंबईबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याबद्दल पत्रकाद्वारे मागितली माफी

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी अखेर माफी मागितली आहे. कोश्यारींनी आज (1 ऑगस्ट) पत्रक प्रसिद्ध करत मुंबईसंदर्भातील (Mumbai) वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. “महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो,” असे म्हणत राज्यपालांनी पत्रकाद्वारे माफी मागितली.

“मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? आणि मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ?,” असे वादग्रस्त कोश्यारींनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात मुंबई बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपालांनी प्रसिद्ध केलेल्या माफीनाम्याच्या पत्रकात म्हटले, “दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.”

राज्यपालांनी पत्रकार नेमके काय म्हणाले

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

राज्यपालांनी मुंबईबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य

अंधेरीत राज्यपाल म्हणाले, “मी लोकांना कधी-कधी सांगत असतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून बाजुला केले, तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत.” मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? असं वक्तव्य कोश्यारींनी केले आहे. गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

संबंधित बातम्या

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य,…तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल

Aprna

नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘या’ तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; राजकारणात एकच खळबळ

Aprna

मी भीमा कोरेगावला जाणारच !

News Desk