HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का | राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा राजीनामा

सातारा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साताऱ्यातील राज्यउपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आज पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, व्यक्तीगतरित्या स्वत:हून राजकारणातून दूर होत असलो तरी पक्षातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकीय प्रवाहात राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासंदर्भात संदीप मोझर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, ” महाविद्यालयीन जीवनापासून मी समाजकार्यात सक्रिय आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवून मला कारावासही भोगावा लागला. मात्र तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवली.

त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रमुख संघटक पदही बहाल केले.”

राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना संदीप मोझर म्हणाले , ” पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अक्षरश: जीवाचे रान केले. पक्ष नेतृत्वानेही माझ्यावर विश्वास दाखवून माझी नेहमीच पाठराखण केली.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात आल्यावर माझ्या निवासस्थानीही आले होते. माझ्या शब्दाखातर अनेककार्यकर्त्यांना पक्षातील जबाबदारीची पदे त्यांनी दिली. “

आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करून श्री मोझर पुढे म्हणाले ,”माझ्या व्यावसायिक नव भरारीसाठी आणि कुटुंबास पुरेसा वेळ देण्यासाठी सक्रिय राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय मी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.पक्षात प्रवेश करतानाच ‘मनसे’हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल’ ही केलेली घोषणा सत्यात आणत, यापुढे कोणताही राजकीय पक्ष, संघटनेत सक्रिय न होता व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष देणार आहे. भविष्यात स्वत: कोणतीही निवडणूक लढविणार नाही .”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा – तसा वाटला का?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

News Desk

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna