HW News Marathi
राजकारण

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

अहमदनगर | लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या, दुस-या टप्प्याती अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. बहुचर्चित अशा अहमदनगर जागेचे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे-पाटील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या पाठोपाठ अजून एका दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दाम्पत्य दुसरे, तिसरे कोण नसून नुकतेच भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि त्यांची पत्नी आहे. काही कारणास्तव उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास आपल्या कुटुंबातील उमेदवारी अर्ज कायम रहावा. यासाठी डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे म्हटले जात आहे.

माजी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर सुजय विखे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विषेश म्हणजे सुजय विखे पाटील यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सुजय विखे-पाटील यांचा चार उमेदवारी अर्ज भरण्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, सुजय यांच्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या पत्नीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

काही कारणास्तव सुजय यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यास, उमेदवारी रद्द होईल. या भीती पोटी सुजय विखे यांनी पत्नीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचे बोलले जाते. वास्तविक पाहता डॉ. सुजय विखे यांनीच चार अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्जात चूक निघाल्यास उमेदवारी रद्द होण्याची शक्यता असते. कुटुंबातील एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात राहावी याकाणामुळे सुजय विखे यांनी चार अर्ज दाखल केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

Aprna

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा अंहकार

swarit

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

News Desk