HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचा खोटेपणा जनतेसमोर आणला !

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा खोटेपणा जनतेसमोर आणला आहे. राहुल गांधी यांनी देशाचा जागतिक स्तरावर अपमान केला असून या प्रकरणी राहुल गांधींनी आता माफी मागावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राफेल विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता नसल्याचे आज (१४ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका देखील फेटाळून लावल्या आहेत.

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.

राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारला वेठीस धरले होते. यूपीए सरकारपेक्षा तिप्पट किंमत देऊन भाजपने राफेल करार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही योग्य वेळ नाही म्हणत लेखिका गीता मेहतांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

News Desk

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

काँग्रेसच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

News Desk