HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा… बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. “अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर आपण मोठा धमाका करु”, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकतेच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, यावर प्रतिक्रिया देताना “माझ्या संपर्कात सात ते आठ आमदार आहेत”, असा गौप्यस्फोट केला.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, “सरकारच्या बाहेरुन विरोधक आरोप करत आहे. हे सुरुवातीपासूनच सुरु आहे. मात्र, घरातला माणूस आरोप करतो तेव्हा फार वाईट वाटते. विना पक्षाचा आणि विना पैशाने मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे लोकांच्या मदतांचा आदर प्रत्येकाने करावा. आमदार रवी राणा यांनी कोणाच्या भरवशावर आरोप केले आहे. हे समोर आले पाहीजे”, असंही बच्चू कडू म्हणाले.

माझावरील आरोप सिद्ध करा नाही तर…

राज्यातील सरकार स्थापनेचे सत्ता नाट्य सर्वांनी बघितले. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराचे केले आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

News Desk

कोरोना’च्या जगजागृतीसाठी लावलेली कॉलर ट्यून त्वरीत बंद करा – बाळा नांदगावकर

News Desk

३१ डिसेंबरला तब्बल ४५५ तळीरामांवर पोलिसांची कडक कारवाई

News Desk