HW News Marathi
राजकारण

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या ३ मोठ्या राज्यांत पराभवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला पुन्हा एकदा स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी भाजपकडून शेतकऱ्यांना तब्बल ४ लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कर्जमाफीचा २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील शेतकरी कर्जमाफीची घोषणा करूनच भाजपने यश मिळवले होते.

भाजप सरकारपुढे आता २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आहे. तीन मोठ्या राज्यांमध्ये झालेल्या दणदणीत पराभवानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोणत्याही मार्गांचा अवलंब करून पुन्हा लोकांची मने जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. तीन राज्यांमधील पराभव हा शेतकरी बांधवांच्या नाराजीमुळे झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने भाजपकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदाची घेतली शपथ

Aprna

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk

“मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरी भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये का?,” आदित्य ठाकरेंना सवाल

Aprna