HW News Marathi
राजकारण

पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद !

मुंबई | राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे शंभर अपराध पूर्ण झाल्याने त्यांनी स्वतः हुन राजीनामा द्यावा,अशी मागणी वारकरी साहित्य परिषद मराठवाड्याचे अध्यक्ष ह.भ.प.ॲड दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या विषयी वाटेल ते छापले गेले. तसेच धर्मवीर श्री शंभाजीराजे यांच्या विषयी चूकीचा मजकूर छापून ..स्वतः चे “विनोद ” नाव सार्थकी लावले. असे म्हणत ज्यांचे पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद असलेला व्यक्ती असून मंत्री विनोद तावडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी आंधळे महाराजांनी केली आहे.

यापूर्वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातून वारकरी संतांचे वाङमय तावडेंनी हद्पार केले. त्यावेळी ॲड.आंधळे महाराज यांनी प्रथम आवाज उठविला होता. अंजली ओक तसेच नितीन ओक, राजाभाऊ चोपदार या वारकऱ्यांनी माझी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, विनोद तावडेंना भेटले त्या तावड्यांनी जे उद्गार काढले ते ऐकून तो किती लायकीचा मंत्री हे कळले होते असेही आंधळे महाराज म्हणाले आहेत.

आता तर संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी विषयी वाटेल ते छापले गेले. स्वतःच्या नावाचा त्यांनी “विनोद ” केला आहे. मंत्री विनोद तावडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी संत वाङमयाचे उपासक तथा संशोधक ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवच – हसन मुश्रीफ

swarit

राजकीय सुडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारी !

News Desk

पुतण्या आला धावून

Gauri Tilekar