HW News Marathi
राजकारण

“दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, संजय राऊतांची राज्य सरकारवर बोचरी टीका

मुंबई | “दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस (Davos) दौऱ्यावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (16 जानेवारी) माध्यमांशी बोलताना राज्यातील प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले आहेत. यावरून संजय राऊतांना माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.

दावोसच्या दौऱ्यातून महाराष्ट्राला काही मिळेल का?, असा सवाल पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारल्यावर म्हणाले, “दावोसमधून काय येईल ते आम्हाला माहिती नाही. इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेहले ते आधी आणा. महाराष्ट्रातील इतर भागातून एअरबस, वेदांता फॉक्सकान असे अनेक दोन लाख कोटीची गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन आलात तर तुमचा दावोसला जाण्याला अर्थ आहे. दावोसमधील करार कसे होतात, हे आम्हाला माहिती आहे. दावोसमधून जगभरातून राज्यकर्ते येतात. आणि आपले करार-मरार करून इकडे येतात, मग तुम्ही इथे सांगात 5 लाख कोटी, 10 लाख कोटीचे करार झाले. आतापर्यंत दावोसला जाऊन किती लोकांनी काय करार केले. आणि इथे किती कंपन्या आल्या आहेत. ते कोणी सिद्ध करू शकले नाही. पण, आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसते. वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा एअरबसचा प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात जे होते. येत होते, आले होते. ते तुमच्या डोळ्यासमोर खेचून घेऊन गेले. दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा.”

सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते

केंद्रीय मंत्री किरण रिजूजू मागणी केलेली आहे की न्यायामूर्तींच्या ज्या नियुक्त्या होत्या. त्यात सरकारचा प्रतिनिधी असावा यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया देत म्हणाले, “कपिल सिब्बल जे कायदे पंडित आहे. त्यांनी सांगितले की, सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते. इतर सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. अगदी निवडणूक आयोग असेल, वृत्त पत्र असतील, संसद असेल, प्रशासन असेल, आता फक्त न्याय व्यवस्थेवरच हतोडा घालायचे बाकी आहे. आणि ती प्रक्रिया सुरू झाल्याची आम्हाला वाटते.”

ईडीने ‘या’ नेत्यांना नोटीस गेल्या की नाही ते बघतोय

बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आलेली आहे, यावर संजय राऊत म्हणाले, “अच्छा, आम्ही तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा जमीन घोटाळा बाहेर काढला होता. एनआयटीच्या 100 कोटीचा जमीन घोटाळा उघडकीस आणला. यानंतर आम्ही अजून दोन मंत्र्यांचे भ्रष्टाचारचे अनेक मुद्दे काढले. यासंदर्भात आम्ही ईडीला देखील माहिती दिली होती. मी बघतोय की त्यांना नोटीस गेले आहे की नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीश कुमार यांनी आज घेतली शरद पवार यांची भेट

Aprna

“कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk