HW News Marathi
राजकारण

…म्हणूनच काँग्रेसची अधोगती होत आहे !

अहमदनगर | “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या काही नेत्यांमुळेच पक्षाची प्रगती होत नाही. आता या नेत्यांनी मागे येऊन नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी”, असे बोचरे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (१२ जून) संगमनेरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत देखील दिले आहेत. आता माझ्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता राहिल्याचे विखे पाटील यावेळी म्हणाले.

“यंदाच्या लोकसभेत मी भाजप-शिवसेनेचा उघडपणे प्रचार केला आहे. त्यामुळे, माझा भाजप प्रवेश हा काही मुद्दा राहिलेला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि मंत्रिपद कोणाला मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे”, असे स्पष्ट विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याचे देखील विखे पाटील यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; उपमुख्यमंत्र्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

Aprna

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk

“…तेव्हा कळेल, वारसाला मिळते की कर्तृत्वाला”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna