मुंबई | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राऊतांच्या न्यायालयाबाहेर वक्तव्य करण्यावर बंदी घाला, अशी मागणी ईडीने मुंबई सत्र न्यायालयात केली होती. परंतु, राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आज (21 ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. यामुळे राऊतांची दिवाळी ही तुरुंगाच जाणार आहे.
ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यापूर्वी राऊतांना 19 सप्टेंबरला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी राऊतांची ईडी कोठडी 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. दरम्यान, ईडीने राऊतांविरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी राऊतांना 5 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली आहे. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
नेमके काय आहे प्रकरण
मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.