HW News Marathi
राजकारण

प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नाही | रामदास कदम

मुंबई | प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा अचानक घेण्यात आलेला नाही. सहा महिने आधीच या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानेही तीन महिने वाढवून दिले होते. प्लास्टिकबंदीची ठिकठिकाणी जाहिरातही करण्यात आली होती. त्यामुळे जर एखाद्या पुढाऱ्याला यासंबंधी माहिती नसेल तर ते त्यांचे अपयश आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये. असे रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांनी यावेळी राज ठाकरेनां देखील निशाण्यावर धरले.

राज ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम यांनी काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा खोचक प्रश्नही यावेळी विचारला स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. राज ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम यांनी काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा खोचक प्रश्नही यावेळी विचारला. आदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानेच फक्त मनसेकडून विरोध होतो आहे असेही रामदास कदम यावेळी म्हणालेत.

राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघने केल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्याला २५ हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांची कैद होणार आहे. दरम्यान मनसेने प्लास्टिक बंदीसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवरुन टीका केली आहे. सर्वसामान्यांकडून दंड वसूल करण्यात येऊ नये असे मनसेने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही – गिरीश बापट

swarit

भाजपामध्ये येणा-यांची रांग मोठी | मुख्यमंत्री

News Desk

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा

News Desk