HW News Marathi
राजकारण

शिवसेने नेते अर्जुन खोतकरांवर EDची कारवाई; सहकारी साखर कारखान्याची जमीन केली जप्त

मुंबई | ईडीने शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त केल्या आहे. ईडीकडून मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकरांच्या जालनातील साखर कारखान्याची जमीन, कारखान्याच्या इमातर आणि प्लांट जप्त केली आहे. खोतकरांच्या साखर कारखान्यांचा बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ईडीने कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील ईडीने या कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. दरम्यान, आता अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच खळबल माजली असून खोतकर सध्याला मुंबईला आहेत. या कारवाई बाबत आम्हाला काही माहीत नाही, संस्थेला अधिकार आहेत कारवाईचे त्यांनी कारवाई केली. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, असं खोतकर यावेळी म्हणाले.दरम्यान, या कारवाईमुळे खोतकर-दानवे वाद पुन्हा चिघळणार असून इडीचा धाक दाखवून थेट भाजप अथवा बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडे खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून खोतकर यांनी मात्र आपण घाबरणार नाही, असं म्हणत यान चर्चेला तूर्तास विराम लावण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं होतं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली होती.

खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच “अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे”, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषद निवडणुकीत अशी आहे मतसंख्या….

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई ?

News Desk

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार, अजित पवार यांच्यातच मतभेद

News Desk