HW News Marathi
राजकारण

प्रभू रामचंद्रांची फसवणूक भाजपाला पडणार महागात

अयोध्या | भाजपाचे सरकार प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली आहे असे विधान राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. भाजप प्रभू रामाचे नाव घेत सत्तेत आले मात्र त्यानंतर त्यांना प्रभू रामाचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

‘भाजपाला २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास, त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी. अन्यथा आगामी निवडणूक जिंकणे भाजपाला जड जाईल,’ असे आचार्य दास म्हणालेत. काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचे बांधकाम तातडीने सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही”, शरद पवारांची खंत

Aprna

राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

News Desk

शिंदे गटाने गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमधील मुक्काम हलविला; गोव्याच्या दिशेने रवाना

Aprna