HW News Marathi
राजकारण

महाआघाडीत पहिली संयुक्त प्रचार सभा २० फेब्रुवारी | अशोक चव्हाण

मुंबई | महाघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवारी (२० फेब्रुवारी) नांदेड येथे होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. महाघाडीची सभा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. या सभेनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. यापूर्वी समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (१४ फेब्रवारी) मुंबईत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत

ही सभा नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवार सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार होणार आहे. ही महाआघाडीची पहिल सभा असल्यामुळे नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेनंतर सोमवारी (२३ फेब्रुवारी) रोजी परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा घेण्यात येणार आहे.

सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे,माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…सर्व समर्थक उड्या मारत होते”, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीका

Aprna

चार वर्षानंतर भाजपला शिवसेनेची ताकत कळाली | संजय राऊत

News Desk

“…उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, नारायण राणेंची बोचरी टीका

Aprna