Site icon HW News Marathi

संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर करणार; जामीन की कोठडी?

मुंबई। पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यामुळे राऊतांना आज (८ ऑगस्ट) पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात हजर करणार आहेत. आज होणाऱ्या सुनावणीत राऊतांच्या ईडी कोठडी वाढ होणार की सुटका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापुर्वी राऊतांना ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावणी होती. न्यायालयात सुनावणीदरम्यान राऊत म्हणाले, मला ज्या ठिकाणी ठेवले आहे, तिथे हवा खेळती नाही. कारण, मला हृदयविकाराचा त्रास असल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासंदर्भात ईडीमधील अधिकाऱ्यांना दिल्याची त्यांनी सांगितले आहे. ईडीने राऊतांना 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली होती.

 नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

Exit mobile version