HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपतींनी केले मोदी सरकारच्या कामाचे कौतुक

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज (३१ जानेवारी) सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाना संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर गेल्या पाच वर्षात देशातील जनतेचा विश्वास संपादन करून ‘नवीन इंडिया’चा निर्माण केला असून देशाला अनिश्चितेतून बाहेर काढले आहे.

तुम्हा सर्वांना माहिती आहे की, “गरीब जनतेचे आरोग्या उपचारावर खूप पैसे खर्च होतात आणि गरीबांना ऐवढे पैसे खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे माझ्या सरकारने ही गोष्ट लक्ष्यात ठेवून सर्व गरीबांसाठी ‘आयुष्यमान भारत योजा’ सुरू केली आहे. या योजने अंतर्गत गेल्या ४ महिन्यात १० लाख गरीब लोकांना यांचा लाभ मिळाला आहे.”

“माझ्या सरकारचे आरोग्य हेच महत्त्वाचे ध्येय आहे. मला तुम्हाला सांगाताना आनंद होत आहे की, ही योजना तळागाळातील गरीब लोकांपर्यंत ही योजना पोहचली आहे. “

जन धन योजने अंतर्गत देशातील तब्बल ३४ करोड लोकांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे. जवळपास देशातील प्रत्येक नागरिकांनी बँकेत खाते उघडले आहे. देशात २०१४-१७ या कालावधीत देशात ५५ टक्के लोकांनी बँक खाते उडले होते. तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा सरकारने पण केला आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढल्याचेही राष्ट्रपती म्हणाले.

यावर्षी महात्मा गांधीजींची १५० वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला असल्याचे प्रतिपादन कोविंद यांनी केले. सरकारकडून ९ लाख कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. सरकारकडून ६ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोबतच तिहेरी तलाकचा निर्णय घेत मुस्लिम भगिनींना दिलासा दिला असल्याचे देखील राष्ट्रपती यांनी म्हटले आहे. सरकारने एक कोटी युवकांना कौशल विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. या योजनेचा लाभ ४ कोटीपेक्षा अधिक युवकांनी घेतला आहे. भारताचे नाव स्टार्ट अप मध्ये आघाडीवर आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक गेहलोत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

News Desk

शेतकऱ्याच्या घटलेल्या उत्पन्नाची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? 

News Desk

“ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही”, हसन मुश्रीफांनी फेटाळले आरोप

Aprna