HW News Marathi
राजकारण

मागासवर्ग आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी अजूनही अस्पष्ट !

मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाकडे सादर केला असला तरी त्या अहवालातल्या शिफारशी अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारने जर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेतला असता तर ४० लोकांचा जीव गेला नसता, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिव डी. के जैन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

‘सरकारची भूमिका सकारात्मक असेल तर आम्ही जरुर सहकार्य करु’, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली भेट घेऊन सहकार्याची विनंती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ‘सरकारने या अहवालातील मजकूर विनाविलंब लोकांसमोर आणून औपचारिकतेपेक्षा लवकरात लवकर अंमलबजावणी करावी’, अशी मागणी यावेळी अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस सत्तेत असताना जेवढे आरक्षण दिले गेले होते तेवढेच आरक्षण आताही दिले पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

मी नांदेडची लोकसभा निवडणूक लढू नये अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी भाष्य केले आहे. मी नांदेडची लोकसभा निवडणूक लढू नये अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या या भावना हायकमांडला कळविणार आहोत. याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादावरुन भाजपावर निशाणा साधला

News Desk

ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी उत्तम उमेदवार !

News Desk

भाजपची जळगावातील उमेदवारी उन्मेष पाटलांना, स्मिता वाघचा पत्ता कट

News Desk