HW News Marathi
राजकारण

“मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतील महाशक्तीवर विश्वास”, संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचा दिल्लीतील महाशक्तीवर विश्वास आहे”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला लावला आहे. राज्यात सत्तांतरावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना संजय राऊतांनी म्हटले. संजय राऊत हे आज (9 जानेवारी) दिल्लीत पत्रकार परिषदेत घतेली. यावेळी राज्यातील सत्तांतरवर तारीख पे तारीख सुरू असले तरी एक तारीख येईल, त्या दिवशी घटनेचा हतोडा या घटनाबाह्य सरकारवर पडले”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

 

उद्या सतासंघर्षावर सुनावणी होणार आहे आणि हे प्रकरण सात घटनापीठाकडे सोपवावे, अशी मागणी केली होती, या मागची नेमकी कारणे काय, असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “या देशात घटना अस्तित्वात राहणार नाही. न्यायालयाचे महत्व राहणार नाही. त्यामुळे जी मागणी आमच्याकडून होते, उद्या सुनावणी आहे. आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. या सरकारच्या बाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. शिवसेनेचा न्यायालय आणि घटनेवर विश्वास आहे. ज्यांनी पक्षांतर आणि सरकार बनविले आहे. जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा जो गट आहे. त्यांचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर आहे. त्यामुळे महाशक्तीविरुद्ध घटना, महाशक्तीविरुद्ध न्यायालय, असा हा सामना आहे. आम्ही न्यायालयाला मानतो, आम्ही घटनेला मानतो. त्यामुळे आमची मागणी योग्य आहे. आणि आम्हाला न्याय मिळेल”, असा विश्वास संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयमध्ये नैतिकता टिकून 

 

नोटाबंदीसंदर्भात देखील न्यायालयाने उशीरा निर्णय दिला, या निकालाचा अर्थही शिल्लक राहिला नव्हता. या प्रकरणात सुद्धा असे होईल का?, पत्रकारांनी असा सवाल संजय राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “दुर्दैवाने मला असे वाटते की, आजचे मरण उद्यावर ठकलले जात आहे. खरे तर बेकायदेशीर सरकार घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेत राहता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय अशा प्रकारचा निर्णय आम्हाला अपेक्षित होता आणि आजही आहे. कारण अत्यंत अपेक्षेने देश सर्वोच्च न्यायालयाकडे पाहत असतो. जेव्हा सर्व न्यायालयाचे दरवाजे बंद होतात. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. आणि आम्ही अपेक्षेणे पाहतो. पण, सध्या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये काय सुरू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तरी सर्वोच्च न्यायालयमध्ये सत्व आणि तत्व टिकून आहे. नैतिकता टिकून आहे. तारखांवर तारखा पडत असल्या तरी एक तारीख जी आहे. ती अशी येईल, त्या दिवशी घटनेचा हतोडा या घटनाबाह्य सरकारवर पडेल.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रथयात्रेच्या परवानगीसाठी आता भाजप सर्वोच्च न्यायालयात

News Desk

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला होणार सुनावणी

Aprna