HW News Marathi
राजकारण

…मग माल्ल्याला चोर कसे म्हणता येईल ?, नितीन गडकरींचा सवाल

मुंबई | भारतीय बँकांना ९००० कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क पाठराखण केली आहे. “महाराष्ट्र सरकारच्या ईकाई सिकॉम या कंपनीकडून विजय माल्ल्याला कर्ज देण्यात आले होते. माल्ल्याने ४० वर्षांपर्यंत ते कर्ज वेळेत पूर्ण भरले होते. परंतु, जर माल्ल्याला कर्जाचे काही हफ्ते फेडता आले नाहीत तर त्याला चोर कसे ठरवता येईल. एखादा व्यक्ती जर आर्थिक संकटात अडकला असेल तर त्याला आपण चोर कसे म्हणू शकतो ?” असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

“विजय माल्ल्याला विमान वाहतूक व्यवसायात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना घेतलेले कर्ज चुकवता आले नाही. परंतु, माल्ल्याने या आधी नियमितपणे कर्ज भरले होते. आता काही आर्थिक अडचणींमुळे माल्ल्याला कर्जाची परतफेड करता आली नाही. म्हणून आपण त्यांना चोर कसे काय म्हणू शकतो ?” असा सवाल नितीन गडकरी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे “जर विजय माल्या आणि नीरव मोदी यांनी खरंच घोटाळे केले असतील तर त्यांना तुरुंगात पाठवावे”, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवागनीमुळे माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सीबीआयचे मोठे यश मानले जात आहे. याचदरम्यान नितीन गडकरी यांच्या माल्ल्याबाबतच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींपाठोपाठ शहांनी घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन

News Desk

काँग्रेसची मोठी घोषणा, १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये

News Desk

हे सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवाल का ?, अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk